देश -विदेशमुख्य बातमी

बांगलादेशात मंदिरांवर, हिंदूंवर हल्ले – परराष्ट्रमंत्री

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांगलादेशातील बिघडलेल्या परिस्थितीबाबत संसदेत माहिती दिली आहे. राज्यसभेत बोलताना परराष्ट्र मंत्र्यांनी मंगळवारी (०६ ऑगस्ट) सांगितले की, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. जानेवारी 2024 मध्ये झालेल्या निवडणुकांपासून बांगलादेशात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे जूनमध्ये विद्यार्थ्यांची निदर्शने सुरू झाली.

ते म्हणाले की, सरकारी इमारती आणि पायाभूत सुविधांवर हल्ले झाले आहेत. जुलै महिनाभर हिंसाचार सुरूच होता. शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याची विनंती केली. परराष्ट्र मंत्री म्हणाले की, अनेक ठिकाणी अल्पसंख्याकांच्या दुकानांवर आणि मंदिरांवर हल्ले झाले आहेत ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. अद्याप संपूर्ण माहिती समोर आलेली नाही.

‘4 ऑगस्टला परिस्थिती सर्वात जास्त बिघडली’

एस. जयशंकर म्हणाले, “बांगलादेश आमच्या अगदी जवळ आहे. जानेवारीपासून तेथे तणाव आहे. जून-जुलैमध्ये हिंसाचार झाला. आम्ही तेथील राजकीय पक्षांच्या संपर्कात होतो. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बांगलादेशातील परिस्थिती बदलली. आणि परिस्थिती अशी बदलली की हसीना यांना 4 ऑगस्टला परिस्थिती आणखीनच बिघडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button